Ad will apear here
Next
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात रंगला संस्कृत दिनाचा कार्यक्रम
वीस विद्यार्थ्यांनी संस्कृत गीतावर सुरेख नृत्याविष्कार सादर केला.

प्रभू श्रीरामाच्या जीवनावरील नृत्याविष्कार.रत्नागिरी : संस्कृतला गीर्वाणवाणी म्हणजे देवांची भाषा असे म्हटले जाते; पण साध्या-सोप्या नियमांचा अभ्यास केला, तर ती कोणीही बोलू शकते. ती रोजच्या संवादाचीही भाषा होऊ शकते, हे रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय संस्कृत दिनी दाखवून दिले. 

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातर्फे शनिवारी (२५ ऑगस्ट २०१८) राष्ट्रीय संस्कृत दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात विद्यार्थ्यांनी संस्कृतमधून गीत, पथनाट्य, बातमीपत्रे आणि संवादात्मक कार्यक्रम सादर केले. प्रभू श्रीरामाच्या जीवनावरील नृत्याविष्कार आणि वीस विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या नृत्याने वाहवा मिळवली. प्लास्टिकबंदीवरील नाट्यही छान रंगले. एका विद्यार्थ्याने सुरेख कथा सांगितली. सुमारे तासभर रंगलेल्या या कार्यक्रमातून वातावरण संस्कृतमय झाले होते.

विचार व्यक्त करताना नीरज दांडेकर. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. कल्पना आठल्ये, प्रा. विवेक भिडे, प्रा. जयंत अभ्यंकर.
विचार व्यक्त करताना संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये

सध्या मुंबईत संस्कृतचे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी नीरज दांडेकर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले, ‘संस्कृतमधून संभाषण ही पहिली पायरी. लेखन ही प्रगती व संस्कृत चिंतन हे आपले उद्दिष्ट हवे. शेजाऱ्यांना बोलावून संस्कृतबद्दल माहिती सांगा. आपले जीवन संस्कृतनेच व्यापले आहे. अनेकदा विद्यार्थ्यांना संस्कृतमधील अनेक संधींची माहिती नसते. संस्कृत, योग, आयुर्वेद शिकवणाऱ्यांना परराष्ट्र मंत्रालयातही नोकरीच्या संधी आहेत. जगात सर्वत्र संस्कृतला मागणी आहे.’

गीतगायन करताना विद्यार्थिनी.

‘माजी विद्यार्थी असल्याने आज कॉलेजमध्ये आल्यावर खूप आनंद झाला. डॉ. आठल्ये यांच्याकडून संस्कृतची प्रेरणा मिळाली. राष्ट्रीय विश्व विद्यालयामध्ये इतिहास, राज्यशास्त्र विषय संस्कृतमधून शिकवणाऱ्या शिक्षकांची गरज आहे. संगणकीय प्रणालीवर संस्कृत भाषेचा प्रभाव आहे. १९८०मध्ये हेन्री फोर्ड शाश्वत सुखासाठी गंगाकिनारी आला होता. तसेच स्टॅलिनची कन्या स्वेतलानाही गंगापूजनासाठी झोपडीत राहिली होती. पैसा आपला नसून श्रीकृष्णाचा आहे, असे ती सांगायची. ही महती संस्कृतमुळेच त्यांना कळली,’ असेही दांडेकर यांनी सांगितले.

संस्कृत गीत म्हणणाऱ्या विद्यार्थिनी

‘सध्याच्या शिक्षण पद्धतीत आकलन आहे; पण धारणा नाही. पाठांतर करायचे व परीक्षेत लिहायचे एवढेच होते. आठवीत शिकलेले दहावीत आठवत नाही. अशा शिक्षणपद्धतीत आपण परिवर्तन केले पाहिजे. आपल्या पाठ्यक्रमात नसलेली पुस्तकेही वाचा. स्वाध्यायातून तुम्हाला संस्कृत तज्ज्ञ होता येईल,’ असा गुरुमंत्रही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

प्लास्टिकबंदीवरील नाट्य.

संस्कृत दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांमधील विजेत्यांना या वेळी गौरवण्यात आले. उपप्राचार्य व संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य प्रा. विवेक भिडे, प्रा. जयंत अभ्यंकर या वेळी उपस्थित होते. प्रा. स्नेहा शिवलकर यांनी आभार मानले.

सहापैकी पाच स्पर्धांमध्ये यश मिळवल्याबद्दल पूर्वा चुनेकर व ऐश्वर्या आचार्य यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

स्पर्धांचा निकाल असा :  

पाठांतर स्पर्धा : प्रथम वर्ष - वरदा पटवर्धन, स्वरूप काणे, ओंकार ओक, मुग्धा पुरोहित, तन्वी दाते, सुखदा ताटके, जागृती देशमुख. द्वितीय वर्ष - नारायणी शहाणे, स्नेहल हर्डीकर, अमृता नायक, ऐश्वर्या आचार्य, तृतीय वर्ष - पूर्वा चुनेकर, शीतल पाध्ये, रेश्मा मालशे, भार्गव वळंजू, जान्हवी घुडे, कोमल खुर्द, हर्षदा मुसळे. 

नाट्यवाचन स्पर्धा : पर्णिका भडसावळे, सुरभी वायंगणकर, अक्षय नवरे, सिमंतिनी जोशी, धनश्री पाटील, वेदिका चव्हाण. 

प्रश्नमंजूषा : सुरभी वायंगणकर, स्वरूप काणे, सुश्रुत चितळे, अमृता नायक, प्राजक्ता साळगावकर. 

गीतगायन : पूर्वा चुनेकर, निधी कशाळीकर. 

(संस्कृत दिन कार्यक्रमाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZMJBR
 संस्कृत विभागाचा अतिशय स्तुत्य उपक्रम.
जास्तीत जास्त समाजापर्यंत असे उपक्रम पाेहाेचणे अावश्यक अाहे.
 faar chhan.
 चांगला उपक्रम. अशा प्रयत्नामुळे संस्कृत भाषेची भीती कमी होऊन ती फक्त देवभाषा न रहाता लोकभाषा होईल.
Similar Posts
‘पाच वर्षांत संस्कृतला आले अच्छे दिन’ रत्नागिरी : ‘देशात गेल्या पाच वर्षांत संस्कृतसाठी ‘अच्छे दिन’ आले आहेत. ‘आयआयटी’मध्ये वैकल्पिक विषय म्हणून संस्कृत शिकवतात. अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्येही संस्कृत शिकवले जाते. तमिळनाडूमध्ये पहिलीपासून सातवीपर्यंत संस्कृत शिक्षण दिले जाते. महाराष्ट्रातील संस्कृत शिक्षकांनीही लोकांना संस्कृत शिकवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे
‘संस्कृत ही वैज्ञानिक भाषा’ रत्नागिरी : ‘संस्कृत ही ठराविक समाजाची भाषा नाही. संस्कृत ही वैज्ञानिक भाषा असून, अनेक विषयांवर वैविध्यपूर्ण साहित्य आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संस्कृत संस्थानच्या संस्कृत केंद्राद्वारे अनेक जण संस्कृत शिकत आहेत. लोकांना याचा फायदा होत आहे,’ असे प्रतिपादन या केंद्राचे शिक्षक हिरालाल शर्मा यांनी केले
रत्नागिरी जिल्ह्यातील संस्कृत शिक्षकांचे प्रशिक्षण शिबिर सुरू रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील संस्कृत शिक्षकांचे पाच दिवसांचे प्रशिक्षण १६ जुलैला सुरू झाले आहे. बदललेल्या अभ्यासक्रमानुसारचे हे महाराष्ट्रातील पहिलेच प्रशिक्षण आहे. नागपुरातील रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग, संस्कृत भारती आणि गोगटे-जोगळेकर
रत्नागिरीत संस्कृत शिक्षण केंद्र सुरू रत्नागिरी : नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संस्कृत संस्थान व रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात अनौपचारिक संस्कृत शिक्षण केंद्र सुरू होत आहे. नव्या वर्गाचे उद्घाटन १० ऑक्टोबरला होणार आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language